तुम्हाला विकासाच्या गाडीत बसायचेय की , विकासाच्या गाडीचा धूर खायचाय ?

कोणच्याही अध्यातमध्यात नसतांना देखील , कोणाचीही जेलसी नसतांना देखील , आपली शेपटी का जाळली जाते ? दुनियेच्या जलव्यात आपण कसे आपोआप ओढलो जातो ? याचे उत्तर तुम्हाला या लेखात मिळेल.

तुमची स्वतःची गाडी असो वा नसो ! रस्त्यावरचा धुर तुमच्या नाकात जाणारच! तिथे तुम्ही असेही म्हणू शकत नाही की मी वाहन चालविले नाही म्हणून मी रस्त्यावरील आणि वातावरणातील धूर मिश्रीत हवा घेणार नाही !
प्राणायाम, योगासने, बंध, मुद्रा, क्रियायोग , सात्वीक आहार जीवनशैली तुमची इम्युनिटी वाढवून देईल ! पण बाहेरील प्रदुषणाकडे दुर्लक्ष करून पण चालणार नाही. नदी शुद्धीकरण करणे, जमिन सुपिक करणे , प्लॅस्टीकचा वापर बंर करणे हे गोष्टी केवळ आपले जीवनच नाही तर मरण देखील सुखकर करतील !
ह्या वर्षीचा टारगेट तीन गोष्टी आहेत बघा , आवाज म्हणजे नॉईस, दुसरा आहेत धुराडा. तिसरा आहे व्हायब्रेशन म्हणजे अस्थिरता ! 
 या गोष्टींवर काम करायचंय ! का ? 
कारण,
माणसाची क्वालीटी आणि गाडीची क्वालीटी , दोन्हीची क्वालीटी खालील तीन बाबींवर तपासली जाते.
 कंपन होणे, धुर सोडणे, आवाज करणे.
आता आपल्याला कुटुंब आणि परिवार लेव्हलवर यावर डिप स्टडी करून ह्यांची क्वालीटी इंम्प्रुव्ह करायची आहे नाहीतर भयंकर मार पडणार आहे!

कारण आपल्या शरीरात खूप सारे इनजीन्स आणि पंपस आहेत आणि एनर्जी जनरेशन मशीन्स, ईन्जीन्स आहेत !
 ते सर्व इंजिन्स मानले जातात !

 तर कोणता पण इंजिन पेटवण्यासाठी ज्वलन होत असते. कोणत्याही इंजिनमध्ये व्हायब्रेशन म्हणजे कंपन होत 
असते. कोणत्या पण इंजिन मध्ये पोल्युशन म्हणजे धूर निघत असतो.

आता टार्गेट म्हणजे लक्ष असे आहे की , कंपन न होणारा इंजिन पाहिजे , धूर न निघणार इंजिन पाहिजे ! आणि ज्वलन जे काही होतं इंजिनमध्ये तर ते इतके सूक्ष्म पद्धतीने पाहिजे की त्याचा धुरच निघणार नाही !

ज्वलन म्हणजे एनर्जी कन्व्हर्जन आहे. इंधनाचे अग्नी आणि प्रकाशात रूपांतरण ! कारण अग्नी आणि प्रकाशा इतके मन जर सोडले तर कोणीच वेगवान नाही !
शरीराचे इंजिन एवढे अॅडव्हान्स आहे की , या इंजीन मध्ये इंधनाचे अग्नी, प्रकाश आणि मन यामध्ये रुपांतरण होते !

 म्हणजे बघा जसे आपल्या शरीरात दोन मुख्य इंजिने आहेत !
 एक म्हणजे श्वासाचे इंजिन !
 आपण श्वास आत घेतो आणि त्याच्यातला ऑक्सिजन रक्तात देतो आणि नंतर मग श्वास बाहेर निघतो नाकावाटे ! तर याच्या ते किती सूक्ष्म ज्वलन होते हे कुणाच्या लक्षात येत नाही .
दुसर शरीरातलं मुख्य इंजिन आहे ते म्हणजे पोटातले ज्वलन !
पोटातला ज्वलन इतका सूक्ष्म पद्धतीने होतं की त्याच्यातून धुर निघणार नाही ! गॅस होणार नाही ! व्यवस्थितपणे पचन होईल !

हे शरीरातील दोन इंजिन जर आपण व्यवस्थित अभ्यास केले तर आपण अशा गाड्यांचे इंजिन बनवू शकतो जे धुरच सोडणार नाही. इंजिन चालू असतांना कंपनच करणार नाही. ज्वलन इतक्या सुक्ष्म आणि अत्याधुनिक पद्धतीने होईल की जळणाऱ्या इंधनाला सुद्धा ज्वलनाचा सुगावा लागणार नाही !

अशी ही विकासाची ( उत्क्रांतिची ) प्रक्रिया आहे  ! त्यामध्ये आपल्याला पडणे भाग आहे. शारीरीक, मानसिक, आध्यात्मिक आणि बाह्य जगतात एकाचवेळी बदल घडत जातील !

पूर्वी  'दृश्य स्वरूपात दिसणारा धुर ' निघणारी वाहने होती ! त्यानंतर  'अदृश्य स्वरूपात धूर ' निघणारी वाहने प्रचलित झाली.

त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटीवर चालणारी वाहने सुरू झालीत. त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि इलेक्ट्रॉनिक्सवर आधारित आणि इंटरनेटवर आधारित वाहने सुरू झाली !

त्याच्यानंतर व्याक्युम आणि अॅन्टीग्रॅव्हिटी तत्त्वावर चालणारी वाहनाची असणार आहेत !

आता मुद्दा असा आहे की , आपल्याला दोन्ही गोष्टी करायचे आहेत  !
एक म्हणजे ह्या बदलामुळे आपल्या शरीरावर बदल होतील  ! हे बदल आपले शरीर सहन करू शकणार नाही  ! त्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक नाही तर अनेक प्रकारच्या शिल्डींग डेव्हलप कराव्या लागतील  !
आणि त्या  शिल्डींग डेव्हलप करताना आपल्या बुद्धीचा भाग कमी व्हायला नको  !  किंवा आपल्या शारीरिक स्नायूंची क्षमता कमी व्हायला नको  ! त्याचप्रमाणे आपली पोटेन्शियल सृजनक्षमता कमी व्हायला नको  !
अशा एक ना अनेक चॅलेंजेस आव्हाने मानव जातीच्या आणि प्रत्येक कुटुंबाच्या प्रधान प्रमुखावर वर आहेत.

दुसरी गोष्ट करावी लागणार ती ही आहे की डोळे मिटून बसूनपण चालणार नाही आणि उत्क्रांतिला विरोध करूनपण चालणार नाही! त्यामुळे जास्तीत जास्त तंत्र कमीत कमी वेळात शरीरात योगा प्राणायाम आहार विहार व्यायाम ज्ञान ध्यान करून डेव्हलप करायची आहेत!
कारण प्रत्येकजण जेव्हा हे करेल तेव्हा आपला देश विकसित देशांच्या यादीत सामिल होईल पण हा तर याचा साईड ईफेक्ट आहे मुख्य फायदा तर हा आहे की सरव्हायव्हल म्हणजे आपण जिवंत राहू हा आहे ! पूर्वी औषध म्हणजे ड्रग्स् खावून शरीराला बधीर करून काम चालून जायचे पण प्रकाश उर्जेवर चालणारी वाहने आल्यापासून याचा उपयोग सरव्हायव्हलसाठी होणार नाही
हे लक्षात घेणे गरजेचे आहे!  ही गोष्ट जोक समजून इग्नोर करण्यासारखी नाही.

जे लोक योग्य ती पाऊले उचलणार नाहीत ते स्वतःच एक इंधन म्हणून या उत्क्रांतिच्या वेगात वापरली जाण्याची दाट शक्यता आहे.

जे लोक गव्हर्मेंटच्या अध्यादेशाची किंवा कायद्याची वाट बघत राहतील ते लोक मूर्ख आहेत कारण भारत हा विकसित देश नाही.

भारतीय गव्हर्मेंटमध्ये उच्चशिक्षित लोकांची कमतरता असल्यामुळे भारतीय गव्हर्मेंट कडून अध्यादेश निघण्याची वाट पाहणे म्हणजे स्वतावर आणि स्वतःच्या कुटुंबावर कुऱ्हाड मारून घेऊन विकलांग अवस्थेत जीवन जगण्याची पाळी येऊ शकते म्हणून शहाण्या आणि उच्चशिक्षित घरांनी या गोष्टीचे महत्त्व जाणून योग्य ती अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू केलेली आहे  !

त्यामुळे विकास प्रक्रियेतील हा मानवी उत्क्रांतिचा भाग पॉझिटिव्हली घेवून आपण सर्वांनी योग्य पावले उचलवावीत. घाबरून जावू नये तसेच गाफिलही राहू नये!
आर्ट ऑफ लिव्हींग सारख्या अनेक संस्था आपणांस मदत करायला पुढे आलेल्या आहेत त्यांना आपण आनंदाने स्विकारावे. आडमुठे धोरण ठेवणे येथे कामात येणार नाही.

या काही अशा सूक्ष्म गोष्टी आहेत , की ज्या केवळ कौटुंबिक आणि पारिवारिक स्तरावर बोलल्या जात आहेत ! बाहेर आपल्याला मौनच ठेवावे लागणार आहे !
‌आपला इतर कोणाशीही क्लॅश होणार नाही . भांडण बोलचाल वादविवाद होणार नाही याची संपूर्ण काळजी घेणे अत्यंत आवश्‍यक आहे. कारण यानेच घसरगुंडी आणि खोखो टळणार आहे ! त्यामुळे बाहेर मौन ठेवणे हाच अत्यंत सुंदर उपाय यावर आहे . 

विघातक शक्ती अर्थचक्र चालू करण्यासाठी आणि उर्जा उत्पन्न करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आणि सूक्ष्म पद्धतीने भांडणे लावायचा प्रयत्न करतील ! त्यामुळे आपल्याला अत्यंत उच्च स्तरावर , उच्च प्लेनवर राहून कोणत्याही चक्रात भटकायचे नाही ! कोणत्याही भांडणात पडायचे नाही ! ही मुख्य खबरदारी आहे आणि आपल्या स्वाध्यायात प्रमाद करायचा नाही ! 

आपली दैनंदिनी बनवून त्याप्रमाणे योग्य आरोग्यदायी दिनचर्या कुटुंबातील प्रत्येकाने फॉलो करणे हे आता कोणालाही सांगावे लागण्याची गरज पडायला नको.
‌जे काही डिस्कशन होणार आहे . ते आपल्या कुटुंबात आणि परिवारातच होईल ! चार चौघात बोलताना राहतांना आपल्याला अत्यंत कुशलपणे व्यावहारिक दृष्ट्या कॉमनसेन्स वापरून आणि चतुराईने राहायचे आहे ! जेणेकरून कोणीही दुखावले जाणार नाही ! कारण की आता ज्ञानाचा शॉक सुद्धा सहन करण्याची मानसिक तयारी बाहेरील लोकांमध्ये नाही ! त्यामुळे केवळ स्माईल द्या ! जय गुरुदेव ओम शांती म्हणा!

परिवारासाठी ही वेळ आपापसात समजूतदारपणा मिटींग्स डिस्कशन अंडरस्टँडिंग कॉम्प्रमाईजसिंग या गोष्टी करण्याची आहे  ! कोणत्याही प्रकारचे सूक्ष्म स्वरूपात सुद्धा वाद घालण्याची ही वेळ नाही ! 

जय मल्हार ||🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

नाना का मॅट्रीक्स !

मायाजाळाची व्याख्या करणे शक्य आहे का ?  कधीही पूर्णपणे ताब्यात न येणारे, कधीही पूर्णपणे न संपणारे, ' मायाजाळ ' हे लोकांना सतत नित्यन...

एकूण पृष्ठदृश्ये :