ह्या ब्लॉगमध्ये एंटरटेनमेंट, इनफोरटेनमेंट आणि प्युअर नॉलेज यांची "सरमिसळ" झालेली आहे ! बऱ्याचशा गोष्टी ट्रान्सस्टेटमध्ये ऑटोराईट झालेल्या आहेत. तरी सुज्ञ वाचकांनी हंसासारखे ' शब्द-मोती ' वेचताना आपला कॉमन सेन्स वापरून, विवेक जागृत ठेवून, समजून घेऊन, न्यून ते पुरते करून घ्यावे आणि आपापल्या जीवनाचा आनंदोत्सव साजरा करावा ! ही नम्र विनंती ! जोशीं सरांचा वडापाव खाऊन शहरात नोकरी-शिक्षणासाठी आलेल्या बंधू-भगिनींना जरी माझ्या या ब्लॉगचा थोडाफार उपयोग झाला तरी हे माझे भाग्यच मी समजेल !
किर्तन Vs वर्तन !
जेव्हा अंगात अंधार असतो, तेव्हा बाह्य जगात प्रकाश असतो ! ( विठ्ठल स्थिती ) आणि, जेव्हा अंगात प्रकाश असतो, तेव्हा जगात अंधार असतो ! (दत्त स्थिती ) ! अश्याप्रकारे, अंधार म्हणजे ' फ ' आणि प्रकाश म्हणजे, ' ट ' यांच्यामध्ये खेळ चालतो ! नेहमी नेहमी बघून आणि अनुभवून, तो प्रकाश आणि अंधाराचा खेळ आपल्या डोक्यात बसतो, तेव्हा त्याची आठवण रहावी. म्हणून, डोक्यात फेटा घालतात.
म्हणजे असं झालं की आपल्यामध्ये दत्ताचा संचार झाला, तेव्हा आजूबाजूचे सर्व कुत्रे वाटू लागतात ! जेव्हा आपल्यामध्ये देवाचा संचार होतो , तेव्हा आजूबाजूला सर्व प्राणी पक्षी वानर वाटू लागतात. म्हणजे, जेव्हा आपल्यामध्ये रामाचा किंवा कृष्णाचा संचार होतो, तेव्हा आपल्याला आजूबाजूचे सर्व दैत्य ,जनावर, राक्षस वाटू लागतात. असे हे ज्ञानाचे श्रीश्रीतत्व आहे. प्रकाश आणि अंधाराचा खेळ आहे.
आपल्या नारदीय किर्तनाचा फेटा आणि फेट्यातलं ज्ञान महत्त्वाचं नसून, आपलं सर्वसामान्य जिवनातील वर्तन महत्त्वाचा आहे, असे साईबाबांनी शिकवले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :
किर्तन Vs वर्तन !
जेव्हा अंगात अंधार असतो, तेव्हा बाह्य जगात प्रकाश असतो ! ( विठ्ठल स्थिती ) आणि, जेव्हा अंगात प्रकाश असतो, तेव्हा जगात अंधार असतो ! (दत्त स्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा