"अजामेळ पापी वदे पुत्र कामे , तया मुक्ती नारायणाचेनी नामे" या वाक्याचा काय अर्थ होतो ?
" अ " म्हणजे दिव्यता !
" जा " जन्म पावलेली जातक इच्छा !
" मे " महादेवाची मारक शक्ती !
" ळ " टाईम असोसिएटेट विथ लाईफ ! जन्म काळ !
" अज " या शब्दाचा अर्थ जन्म न पावलेला, अदृश्य स्वरूप असलेला ! प्रकाश किंवा अंधार स्वरूप शक्ती !
" अज " या शब्दाचा अजून एक अर्थ पवित्र दिव्य शरीर !
पवित्र दिव्य शरीरावर भरण पोषणासाठी अवलंबून असणारे धुर्त लोक , ते शरीर जर्जर झाल्यावर मारून टाकतात. जशी गाय दूध देणे बंद केल्यावर मारली जाते. अशा धुर्त कपटी लोकांच्या संघाला " अजामेळ पापी " म्हणतात.
रामराज्याची स्थापना करू ! दिव्य समाजाची निर्मिती करू ! स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती करू ! स्वातंत्रय मिळवू ! त्यासाठी सामुहीकरित्या महादेवाची मारक शक्ती वापरू ! अश्या प्रकारची धारणा म्हणजे सुद्धा *इंद्रियदमन पावित्र्य प्रामाणिकपणा सच्चाई योग ध्यान धारणा समाधि आभ्यासाशिवाय* "अजामेळ पापी " होऊन जाते.
पितर पैत्रपौत्र यांच्या कामी येऊ, आपल्या पुत्राला जन्म देऊ,
ज्ञान देऊन शिकवू म्हणजे तो आपल्याला मुक्ती देईल ही धारणासुद्घा "पुत्रकामे" या संज्ञेत येते.
" ना " म्हणजे मायाजाळाची उत्पत्ती करणारा ! नारायण !
" मे " म्हणजे महादेवाची मारक शक्ती !
" नामे " नारायणाहातून मरण !
" तया मुक्ती नारायणाचेनी नामे " याचा अर्थ भगवंताच्या हातून मरण आल्यावर मुक्ती मिळणे !
त्यासाठी भगवंताना पृथ्वीवर जन्म ह्यावा लागेल ! तोपर्यंत हा
कुरु किंवा ययाति किंवा रावण किंवा कंस किंवा चांगदेवासारखा हजारो वर्षाचा जख्खड अजगर झालेला असेल आणि भगवंत भक्त नसलेल्याला सहजासहजी नाही मारत !
तेलात उकडलेला उकडीचा मोदक जसा गणपतीला आवडतो ! किंवा कडक अंडे उबवून किंवा उकडून जसे खातात ! त्याचप्रकारे पंचतत्व अशा व्यक्तीला संसारी त्रिशुळाच्या ऑईल मध्ये बॉईल करून मौत देतात.
अशावेळी देवाचे नाव आठवणे कठीण होते.
म्हणून संसारात कर्माचा हिसाब किताब मोकळा करून , मोह मायेचा त्याग करून, दया क्षमा शांति ज्ञान सरस्वति स्थापन केल्यावर भक्तीयुक्त, विसडम युक्त, योगध्यान , समाधि साधनेचा आयुष्यभर अवलंब करावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा